लिंबू सरबत हे कोणत्याही ऋतूत पिले तरी त्याचे नुकसान काहीच होत नाही. मात्र, उन्हाळ्यात विशेष करून काही तरी झटपट गार प्यावे वाटते. अशा वेळी लिंबू सरबत हा उत्तम पर्याय असतो. लिंबू, मीठ आणि साखर यांच्या योग्य मिश्रणाने लिंबू पाणी तयार करता येते. तुम्हाला उन्हामुळे गरगरल्यासारखे होत असेल तर लिंबू सरबत प्या त्याने आराम मिळतो.