उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत भारतीय महिलांचा पराभव

उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत भारतीय महिलांचा पराभव

पी. व्ही. सिंधूसह अन्य खेळाडूही छाप पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाला दक्षिण कोरियाने ५-० अशी धुळ चारली. परंतु भारताने पहिले दोन सामने जिंकून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले होते. त्यामुळे आता गुरुवारी त्यांच्यापुढे थायलंडचे आव्हान असेल.

बुधवारी झालेल्या ड-गटातील अखेरच्या साखळी लढतीपूर्वी भारताने अनुक्रमे कॅनडा आणि अमेरिका यांना नमवले होते. त्यामुळे भारताला गटातील अग्रस्थानासह आगेकूच करण्याची संधी होती. मात्र कोरियापुढे भारताचा निभाव लागला नाही.

* एकेरीच्या पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या अॅन सेन यंगने दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूला २१-१५, २१-१४ असे सहज पराभूत केले.

* दुहेरीत शेन शेंगुचान आणि ली सोई यांनी भारताच्या शृती मिश्रा-सिमरन संघी जोडीवर २१-१३, २१-१२ असे वर्चस्व गाजवले.

* एकेरीच्या दुसऱ्या लढतीत किम यॉनने आकर्षी कश्यपवर २१-१०, २१-१० असे प्रभुत्व गाजवले.

* दुहेरीत्या दुसरी लढतीत किम आणि काँग हीयाँग यांनी तनिषा क्रॅस्टो-त्रिशा जॉली यांच्यावर २१-१४, २१-११ अशी मात केली.

* अखेरच्या लढतीत सिम युजीनने अश्मिता छलिहावर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवून एकूण ५-० अशा फरकाने भारताला नमवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in