
बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ५५ प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक वृत्तानुसार बस उलटल्याने झालेल्या या अपघातात २० ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.