महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी आसाममधील गुवाहाटी येथून बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर परिस्थिती बदलेल, असे सांगितले. या वादळातून महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गुजरात आणि त्यानंतर आसाममध्ये कसे नेण्यात आले हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांना मदत करणाऱ्या सर्वांची नावे घेण्याची गरज नाही.