मुंबर्इ : भाजपला सोडचिठ्ठी देऊन सुरुवातीस काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत गेलेले जळगावचे भारदस्त नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर निघालेले शिंदे गट आता भाजपमध्ये जाणार असल्याचा अंदाज मंगळवारी व्यक्त केला. त्यांचा निर्णय जवळपास झाल्यात जमा आहे, अशा शब्दांत खडसेंनी आपले म्हणणे मांडले आहे.
याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना खडसे म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय झाल्यात जमा आहे. यापूवीर्ही शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय? याबाबत चर्चा झाल्या आहेत. त्यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय गट स्थापन करणे आणि दुसरा पर्याय एखाद्या पक्षात सामील होणे हा होय. खडसे पुढे म्हणाले की, भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. कारण पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होर्इल असा प्रश्न उपस्थित होणार, असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला आहे. खडसे सध्या काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते म्हणाले, भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करीत असणाऱ्यांची फारच अडचण होणार आहे. भाजपमध्ये गेले तर शिंदे गटातील आमदारांना फायदा होर्इल. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याचेही खडसेंनी सांगितले. ते म्हणाले, आता भाजपमध्ये गेले तरच या आमदारांची अपात्रतेची कारवार्इ वाचू शकते. आज तरी भाजपमध्ये जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही, मात्र भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करीत असलेल्यांची मात्र अडचण होणार आहे. नाव व पक्षचिन्हावरून अद्यापही संभ्रमाचेच वातावरण आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून शिंदे गट व ठाकरे गटात निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा असेल असा निर्वाळा दिला आहे, मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयही प्रलंबित आहे. अशा वेळी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की, तांत्रिक अडचणी आल्या तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळावर निवडणूक लढवू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसे सांगतील तसाच निर्णय आम्ही घेऊ. त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून निवडणूक लढायला सांगितले तर अपक्ष म्हणून लढवू. त्यांनी सांगितले, भाजपकडून लढा तर भाजपकडून लढू. आमचे सर्व निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, असे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.