‘लास्ट सिन थिअरी’ पुरावा ग्राह्य धरता येणार नाही; मुंबई हायकोर्ट

शेवटच्या पाहिलेल्या वेळेत आणि मृत्यूच्या वेळेत समानता असल्यामुळे, आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरावे विचारात घेतले जाऊ शकत नाहीत
‘लास्ट सिन थिअरी’ पुरावा ग्राह्य धरता येणार नाही; मुंबई हायकोर्ट

पीडितेसोबत आरोपीला शेवटचे पाहिले असताना पीडितेच्या मृत्यूसमयी ‘लास्ट सिन थिअरी’ हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने ३२ वर्षीय पुरुष आणि एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक आजारी व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

मृत पीडिताला शेवटी आरोपीच्या सहवासात आणि मृत्यूच्या वेळी पाहिले गेले. शेवटच्या पाहिलेल्या वेळेत आणि मृत्यूच्या वेळेत समानता असल्यामुळे, आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरावे विचारात घेतले जाऊ शकत नाहीत. फिर्यादीनुसार, गौतम परदेशी आणि राहुल जाधव यांनी २०१३मध्ये पीडित व्यक्तीला जेवण देण्याच्या बहाण्याने त्याला धक्काबुक्की आणि मारहाण केली. घटनेनंतर, पीडित व्यक्तीमध्ये भूत असून त्यांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट विहिरीत लावली, असे एका आरोपीने त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले होते.

सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या आदेशाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. १ जानेवारी २०१४ रोजी एका गावातील विहिरीत नग्न मृतदेह सापडल्यानंतर तपासानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती. १३ साक्षीदार तपासल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने मृत व्यक्तीला आरोपींसोबत पाहिले होते. मानसिक रुग्ण असलेल्या पीडित व्यक्तीला जेवण देण्याच्या बहाण्याने प्रवीण, गौतम आणि राहुल यांनी त्याला पंपहाऊसमध्ये नेले आणि मारहाण केली, असा दावा एका साक्षीदाराने केला; मात्र साक्षीदाराने साक्ष देताना आणि प्रत्यक्ष घटना पाहताना मद्यप्राशन केले होते; परंतु मद्यधुंदी उतरल्यानंतर त्याने ही घटना आपण पाहिली नसल्याचे कोर्टाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने साक्षीदाराच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता, आरोपी आणि पीडित यांना कुणीही एकत्र नसल्याचे मानत या दोघा आरोपींना निर्दोष मुक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in