जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबद्दल शिवसेनेकडून जाहीर निषेध

खासदार राजन विचारे हे आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत सहमत असतील तर तसे सांगावे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबद्दल शिवसेनेकडून जाहीर निषेध

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यांचा शिवसेनाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या बाजूला बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जाहीर निषेध करा, आम्हाला शिकायला येऊ नका. खासदार राजन विचारे हे आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत सहमत असतील तर तसे सांगावे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोमवारी शिवसेना मध्यवर्ती शाखेत झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुकाप्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रवी पाटील, संतोष चव्हाण, पंढरीनाथ पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध केला. ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सणसणीत कानाखाली खेचल्याच्या घटनेच्या अपमानाचा आव्हाड यांनी बदला घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न संपले आहेत असे त्यांना वाटत आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा घडवायची. उल्हासनगरला सिंधी समाजाबाबत बोलायचे. धर्मवीर आनंद दिंघेबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही. विकास, कामाबद्दल काही नाही. एवढे काम राहिले नाही. रस्त्यवर उतरावे लागेल, मोठे जनांदोलन करावे लागले. राजन विचारेंचा हि त्यांना पाठींबा आहे. तस त्यांनी जाहीर करावे.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मागच्या २३ तारखेलाची आनंद मठ येथे बोलले होते दिघे साहेबांनी फार कष्ट घेतले होते. ते कोणासमोर झुकले नाहीत. पण आता आव्हाड म्हणाले कि शरद पवार याच्या समोर ते झुकले मग तुम्ही शांत का बसले आहात. तुम्ही लाज सोडून मुस्लीमधार्जीन आहेत अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसता. विकास कामाच्या राजकारणाला विरोध करता. आम्हाला शिकायला येऊ नका. तर तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल. शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक प्रश्न संपले आहे असे त्यांना वाटत आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा घडवायची असे काम सध्या त्यांच्याकडे राहिले आहे. धर्मवीर आनंद दिंघेबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही. आम्ही आव्हाड यांचा पत्रकार परिषदेत जाहीर निषेध करतो.

अडकविले पण तुम्हीच असणार ?

त्यावेळी शरद पवार हे कॉंग्रेसमध्ये होते. जर शरद पवारांनी सोडवीले आहे असे जर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणत असतील तर त्यांना याचा लोकांनीअडकविले असेल. कॉग्रेस फोडून राष्ट्रवादी कोणी केली ? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in