@colorsmarathi/ Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathiच्या घरात रंगणार कॅप्टनसीचा टास्क; कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?

Captaincy Task: 'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी पदासाठी सर्व प्राण्यांची तहान भागवावी लागणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 55 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात. घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र मज्जा येईल.

'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान. दरम्यान प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणत आहेत,"आपली तहान भागवा". अरबाज म्हणतोय,"हे खूप गोड पाणी आहे". अरबाजला निक्की विचारतेय,"कालपासून तू इतका गोड होतास...अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?".

पॅडी दादा वर्षा ताईंना विचारत आहेत,"आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?". त्यावर वर्षा ताई "हो असं वाटलं होतं", असं उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्टच म्हणतात,"स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार".

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको