आंतरराष्ट्रीय

२०२८ पूर्वी भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो!

जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर 'शाश्वत आर्थिक विकासाकडे भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देणे

Swapnil S

दावोस : भारत २०२८ पूर्वी पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकेल आणि देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या हिताचे रक्षण करण्यासाठी देशाचे ऊर्जा संक्रमण सुव्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी प्रतिपादन केले.

जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर 'शाश्वत आर्थिक विकासाकडे भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देणे' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की भारताला शाश्वततेच्या उद्दिष्टांप्रती असलेल्या वचनबद्धतेची जाणीव आहे आणि वाढत्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करताना सर्व लक्ष्य वेळेत पूर्ण करेल. मला वाटत नाही की आम्हाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी २०२९ पर्यंत वाट पाहण्याची गरज आहे आणि आपण काय घडत आहे ते पाहिल्यास ते २०२८ च्या आधी घडले पाहिजे, असे विविध मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर्सचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको