आंतरराष्ट्रीय

भारतीयांना म्यानमारमध्ये पोहोचताक्षणीच व्हिसा

भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो

नवशक्ती Web Desk

यांगून : शेजारच्या म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रह्मदेशात भारतीय पर्यटकांसाठी विमानातून उतरताच ऑन अरायव्हल तत्काळ व्हिसा देण्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. देशात पूर्वीप्रमाणे पर्यटक यावेत आणि देशाची भरभराट व्हावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला एक वर्षासाठी चाचणी पातळीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. लवकरच योजना सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

योजना सुरू झाल्यानंतर व्हिसाधारक निषिद्ध ठिकाणे सोडून संपूर्ण देशात कोणत्याही ठिकाणी जाता येणार आहे. सध्या भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो. त्यासाठी ऑनलार्इन अर्ज करावा लागतो.

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज

Mumbai : रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा धोका रोगासारखा फैलावतोय; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचा पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप