आंतरराष्ट्रीय

भारतीयांना म्यानमारमध्ये पोहोचताक्षणीच व्हिसा

भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो

नवशक्ती Web Desk

यांगून : शेजारच्या म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रह्मदेशात भारतीय पर्यटकांसाठी विमानातून उतरताच ऑन अरायव्हल तत्काळ व्हिसा देण्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. देशात पूर्वीप्रमाणे पर्यटक यावेत आणि देशाची भरभराट व्हावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला एक वर्षासाठी चाचणी पातळीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. लवकरच योजना सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

योजना सुरू झाल्यानंतर व्हिसाधारक निषिद्ध ठिकाणे सोडून संपूर्ण देशात कोणत्याही ठिकाणी जाता येणार आहे. सध्या भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो. त्यासाठी ऑनलार्इन अर्ज करावा लागतो.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी