आंतरराष्ट्रीय

भारतीयांना म्यानमारमध्ये पोहोचताक्षणीच व्हिसा

नवशक्ती Web Desk

यांगून : शेजारच्या म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रह्मदेशात भारतीय पर्यटकांसाठी विमानातून उतरताच ऑन अरायव्हल तत्काळ व्हिसा देण्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. देशात पूर्वीप्रमाणे पर्यटक यावेत आणि देशाची भरभराट व्हावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला एक वर्षासाठी चाचणी पातळीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. लवकरच योजना सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

योजना सुरू झाल्यानंतर व्हिसाधारक निषिद्ध ठिकाणे सोडून संपूर्ण देशात कोणत्याही ठिकाणी जाता येणार आहे. सध्या भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो. त्यासाठी ऑनलार्इन अर्ज करावा लागतो.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस