महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; सुमारे तासभर चर्चा

विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची २० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

Swapnil S

जालना : विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची २० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

विखे-पाटील आणि जरांगे यांच्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा भेट झाली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर विखे-पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी जरांगे यांनी २० ऑक्टोबरला बैठक बोलाविली आहे. त्यामुळे त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

जरांगे यांनी महायुतीवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्यानंतर ही भेट झाल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. जरांगे यांनी उमेदवार रिंगणात उतरविले, तर मुख्यत्वे भाजपचे आणि सर्वसाधारणपणे महायुतीचे राजकीय नुकसान होणार आहे, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही फैसला

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार

शरद पवारांची राष्ट्रवादी BMC तून आऊट; एक नगरसेवक असल्याने पक्ष कार्यालयाला मुकावे लागणार

अंबरनाथ नगरपरिषद सत्तावाद : शिवसेना-NCP की BJP-काँग्रेस? खरी आघाडी कोणाची? जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसांत निर्णय घ्यावा - HC

Mumbai : महापौर महायुतीचाच; देवेंद्र फडणवीस यांची दावोसमधून एकनाथ शिंदेंशी फोनवरून चर्चा