नाना पटोले एएनआय
महाराष्ट्र

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न - पटोले 

बीड, परभणीतील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र महायुतीचे सरकार या प्रकरणी कारवाईचा बनाव करत आहे.

Swapnil S

मुंबई : बीड, परभणीतील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र महायुतीचे सरकार या प्रकरणी कारवाईचा बनाव करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून काय उत्तर समोर येणार हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड परभणीतील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको