महाराष्ट्र

फडणवीस-जरांगे येणार एकाच व्यासपीठावर?

मंगळवेढा येथे २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Swapnil S

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवेढा येथे २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या सोहळ्याचे आयोजन भाजप आमदार समाधान अवताडे (पंढरपूर-मंगळवेढा) यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण दिले असून, तेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, जरांगेंनी कार्यक्रमास येण्यास होकार दिला का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

...तर मोठी घडामोड ठरणार

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यांत जरांगे-पाटलांच्या नेतृत्वात राज्यात तीव्र आंदोलन झाले. त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्याविरोधातही वक्तव्ये केली. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर हा सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे. आता या कार्यक्रमाला जरांगे-पाटील येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे या कार्यक्रमाला आले, तर ही मोठी घडामोड ठरेल.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको