नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये नुकताच एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. भारतीय सैन्यातील तरुण अधिकारी कॅप्टन भारत भारद्वाज यांनी कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काही क्षणांतच आपल्या दीर्घकाळच्या प्रेयसी आरुषीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. या अनोख्या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांकडून या जोडप्याचे कौतुक केले जात आहे.
हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयोजित समारंभात कॅप्टन भारत भारद्वाज यांनी अधिकृतपणे हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी स्वीकारली. यानंतर त्यांनी उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रांच्या साक्षीने आरुषीला प्रपोज केले.
मागे लष्करी हेलिकॉप्टर उभे असताना कॅप्टन भारद्वाज एका गुडघ्यावर बसले आणि अंगठी देत त्यांनी आरुषीला लग्नाची मागणी घातली. हा क्षण पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
आरुषीने आनंदाने स्वीकारला प्रस्ताव
अचानक घडलेल्या या खास प्रसंगामुळे आरुषी भावूक झाली. तिने आनंदाने लग्नाचे प्रपोजल स्वीकारताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. प्रेम, कुटुंब आणि लष्करी अभिमान यांचा सुंदर संगम या प्रसंगी पाहायला मिळाला.
सोशल मीडियावर व्हिडीओची जोरदार चर्चा
या प्रपोजचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी कॅप्टन भारद्वाज यांच्या या कृतीचे कौतुक करत हा क्षण "मनाला भिडणारा" असल्याचे म्हटले.
अनेक सोशल मीडिया युजर्सने व्यावसायिक यशासोबत वैयक्तिक आयुष्यातील आनंद साजरा करण्याची ही सुंदर पद्धत असल्याची प्रतिक्रिया दिली.
"घरात पत्नीचाच अधिकार असतो"
या प्रसंगी कॅप्टन भारद्वाज यांनी केलेल्या एका विनोदी वक्तव्याचीही चर्चा रंगली. ते म्हणाले, "लष्करात अधिकारी एकमेकांना सलाम करतात, पण घरामध्ये खरा अधिकार पत्नीचाच असतो." त्यांच्या या हलक्याफुलक्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे महत्त्व
नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल हे भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते. येथे अधिकाऱ्यांना लष्करी हवाई मोहिमा आणि कॉम्बॅट हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
आर्मी एव्हिएशन पायलट होण्यासाठी अधिकाऱ्यांना कठोर प्रशिक्षण प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे या प्रशिक्षणातून यशस्वीपणे बाहेर पडणे हे कोणत्याही अधिकाऱ्यासाठी अभिमानाची बाब मानली जाते.