दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार 
महाराष्ट्र

दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता ते ‘एकत्रित’ स्वरूपात दिले जाणार आहेत. गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव अधिक सुटसुटीत आणि इतर शासकीय कागदपत्रांशी सुसंगत असणार आहे.

मंडळाने नावाचा क्रम बदलून तो ‘विद्यार्थ्याचे नाव- वडिलांचे नाव-आडनाव’ असा सलग करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या संदर्भात सर्व विभागीय मंडळांना अधिकृत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपासून केली जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन स्वतंत्र कागदपत्रे दिली जात होती, परंतु आता ही दोन्ही कागदपत्रे एकाच पानावर एकत्रितपणे छापली जातील.

मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणार; पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचा निर्धार

ट्रम्प भडकले! जा, तुमचे तेल तुम्हीच मिळवा; ब्रिटन, फ्रान्सला इशारा

रेडी रेकनर दर ‘जैसे थे’; घर खरेदीदारांना मोठा दिलासा

Maharashtra Weather Update : अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट, वादळी पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रालाही बसेल फटका, हवामान विभागाचा अंदाज

आता भारताला इराणचे तेल; सात वर्षांनंतर पहिल्यांदाच