Mumbai : पालिका अभियंत्यांच्या बदल्या आता ऑनलाइन; एका विभागात तीन वर्षेच राहता येणार, पालिकेचे परिपत्रक जारी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पालिका अभियंत्यांच्या बदल्या आता ऑनलाइन; एका विभागात तीन वर्षेच राहता येणार, पालिकेचे परिपत्रक जारी

मुंबई महापालिकेत बदल्या रेट कार्ड ठरले, असा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला. त्यानंतर बुधवारी मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत आता अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात असेल तर प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेत बदल्या रेट कार्ड ठरले, असा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला. त्यानंतर बुधवारी मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत आता अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात असेल तर प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे. पालिका या निर्णयामुळे आता बदल्यांवरुन होणाऱ्या आरोपांना पूर्णविराम मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेने २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एकाच खाते किंवा विभागात सलग तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांची बदली दरवर्षी १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेसाठी संबंधित अभियंत्यांना ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून बदलीसाठी प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना किमान एक आणि कमाल पाच प्राधान्यक्रम देण्याची मुभा असेल. ऑफलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम स्वीकारले जाणार नाहीत.

दिव्यांग किंवा वैद्यकीय कारणांमुळे बदलीची आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पालिका प्रशासनाच्या मते, उपलब्ध रिक्त पदे, प्रशासकीय आवश्यकता आणि लागू नियमांचा विचार करून संगणकीकृत रॅण्डमायझेशन प्रणालीद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय

अभियांत्रिकीच्या संस्थात्मक प्रवेशावर कडक नजर; सीसीटीव्हीची नजर, निरीक्षकही नेमणार

बार कौन्सिलचे मिश्रा यांचे पद केवळ तात्पुरते; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय

उपांत्य फेरी गाठण्याची संधी; भारतीय महिलांची आज हाँगकाँगशी गाठ, फलंदाजांकडून सुधारणा अपेक्षित