Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू

मानखुर्द येथील जनतानगर परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली.

Swapnil S

मुंबई : मानखुर्द येथील जनतानगर परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा ज णांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मृत आणि जखमींची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द येथील जनता नगर येथील हनुमान मंदिरामागे असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील दोन ते तीन घरांचा भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे एम/पूर्व विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

बचाव पथकाने युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच जखमींना (चार महिला व एक पुरुष) रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोसळधार! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद

पावसाच्या तडाख्याने जनजीवन ठप्प; गावे जलमय, रस्ते बंद, पर्यटनस्थळांवर बंदी

Mumbai : वरळी मेट्रो स्थानकात गळती; ए-२ प्रवेशद्वार दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद

Mumbai : ...तर काशी-मथुरा किती लुटतील? रामरक्षा आंदोलनात ठाकरे यांचा सवाल

Mumbai : ७ दिवसांत ५५० हून अधिक झाडांची पडझड