मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नसून, तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वापाच वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल मार्गावरील वाशीकडे जाणाऱ्या टी जंक्शन, उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला ही टी जंक्शनजवळून जात असताना भरवेगात जाणाऱ्या एका कारने तिला जोरात धडक दिली होती. अपघातानंतर तिला वैद्यकीय मदत देणे तसेच अपघाताची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही आरोपी चालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत महिलेकडे तिची ओळख पटेल, अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन