मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नसून, तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वापाच वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल मार्गावरील वाशीकडे जाणाऱ्या टी जंक्शन, उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला ही टी जंक्शनजवळून जात असताना भरवेगात जाणाऱ्या एका कारने तिला जोरात धडक दिली होती. अपघातानंतर तिला वैद्यकीय मदत देणे तसेच अपघाताची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही आरोपी चालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत महिलेकडे तिची ओळख पटेल, अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली