मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नसून, तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वापाच वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल मार्गावरील वाशीकडे जाणाऱ्या टी जंक्शन, उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला ही टी जंक्शनजवळून जात असताना भरवेगात जाणाऱ्या एका कारने तिला जोरात धडक दिली होती. अपघातानंतर तिला वैद्यकीय मदत देणे तसेच अपघाताची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही आरोपी चालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत महिलेकडे तिची ओळख पटेल, अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको