संग्रहित फोटो  
राष्ट्रीय

मोदींनी शपथ घेतल्यानंतरही दहशतवाद वाढला, काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसने, मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतरही राज्यातील दहशतवाद वाढला असल्याचा आरोप केला.

Swapnil S

श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसने, मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतरही राज्यातील दहशतवाद वाढला असल्याचा आरोप केला. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून अनेक वर्षांपूर्वी थंड झालेल्या दहशतवादाने पुन्हा या प्रदेशात शिरकाव केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ९८ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले झाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनात यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. दहशतवादाला पायबंद घालण्यात आल्याचे मोठे दावे करण्यात आले, मात्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ९८ दिवसांत २५ दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामध्ये २१ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर अन्य २८ जण जखमी झाले. त्याचप्रमाणे १५ नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आणि ४७ जण जखमी झाले, असेही त्या म्हणाल्या.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद