पाटणा/लखनऊ : बिहारमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पाटणा, खगडिया, रोहतास, औरंगाबाद, कैमूर आणि छपरा यासह २० जिल्ह्यांमध्ये भरदिवसा सर्वत्र अंधार पसरला आणि नंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.
राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. अंधार पसरल्याने अनेक लोक वाहनांचे दिवे लावून प्रवास करताना दिसले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये पुढील तीन दिवस हवामान असेच राहील. तर शेजारी उत्तर प्रदेशात ताशी १०० किमी वाहणाऱ्या वादळीवाऱ्यांनी कहर केला असून, एक निर्माणाधीन पूल कोसळून त्याखाली ६ जण चिरडले गेले आहेत.