राष्ट्रीय

मोदी-नेतन्याहू यांच्यात फोनवरुन चर्चा ; कठीण काळात सोबत असल्याचा दिला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.

नवशक्ती Web Desk

हमाससोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरुन चर्चा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत लिहिल आहे की, "मला फोन करुन परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल मी पंतप्रधान नेतन्याहूंचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो."

पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) रोजी इस्त्रायलवर रॉकेट हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं होतं. इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्लाने धक्का बसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटलं होतं.

एसोसिएटेड प्रेस या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले वाढवले आहेत. गाझामधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या हल्लात ६८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३७०० हून अधिक जखमी झाले आहेत. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलममध्ये ९००हून अधिक जणांचे जीव गेले आहेत.

सुरु त्यांनी केलं संपवणार आम्ही

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलय याच्यातील संघर्ष तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या ९००हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ५००हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरु केले नाही. पण या युद्धाचा शेवट मात्र आम्ही करु, असं म्हणत त्यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.

Donald Trump Tariffs: "फक्त ८ तास झालेत, अजून बरंच काही पाहायला मिळेल"; भारतावर ५० टक्के टॅरिफनंतर ट्रम्प यांची पुन्हा धमकी

बिहार मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसात माहिती सादर करा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; मुंबई महानगर पालिका निवडणुकीची नांदी

महादेवी हत्तीण: कोल्हापूरकरांचा एकजुटीचा लढा यशस्वी, हत्तीण परत येणार, नांदणी मठातच होणार ‘वनतारा’चे केंद्र

‘बेस्ट’वरील नियुक्तीवरून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव; दोन वेगवेगळ्या विभागांचे शासन निर्णय जारी