राष्ट्रीय

युद्धात नुकसानीपेक्षा अंतिम परिणाम महत्त्वाचा! सीडीएस अनिल चौहान यांनी केले स्पष्ट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘फ्युचर वॉर अँड वॉरफेअर’ या विषयावरील व्याख्यानात जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर महत्त्वाचे विधान केले आहे.

Swapnil S

पुणे : लष्करी कारवाईत झालेले नुकसान महत्त्वाचे नसते, तर अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो. व्यावसायिक लष्करी दले नुकसानीने घाबरत नाहीत, असे भारताचे संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘फ्युचर वॉर अँड वॉरफेअर’ या विषयावरील व्याख्यानात जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लष्करी कारवाईत झालेले नुकसान महत्त्वाचे नसते, तर अंतिम परिणाम महत्त्वाचे असतात.

९ मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानची मनीषा भारताला ४८ तासांत गुडघे टेकायला लावण्याची होती. पाकिस्तानने अनेक हल्ले केले आणि हा संघर्ष वाढवला, तर भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. मात्र, पाकिस्तानला अपेक्षित असलेले ४८ तासांचे ऑपरेशन केवळ ८ तासांतच भारताने निष्फळ केले. यानंतर, पाकिस्तानने थेट भारताला फोन करून चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. ७ मे रोजी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरच भारताने पाकिस्तानला त्याबाबत माहिती दिली होती, असेही त्यांनी नमूद केले.

सीडीएस अनिल चौहान म्हणाले की, पाकिस्तानची ड्रोन क्षमता भारताच्या तुलनेत खूप कमकुवत आहे. भारताकडे मजबूत 'काऊंटर ड्रोन सिस्टम' असल्याचे त्यांना माहीत आहे. हे पहिले असे 'संपर्करहित युद्ध' होते, जे भारताने लढले, ज्यात कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक ऑपरेशन्सचे मिश्रण होते.

या संघर्षाची सुरुवात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून झाली होती, ज्याला जनरल चौहान यांनी 'अतिशय क्रूर' संबोधले. दहशतवाद हा युद्धाचा योग्य मार्ग मानला जाऊ शकतो का? या प्रश्नावर त्यांनी तसे वाटत नाही, कारण दहशतवादाला कोणताही निश्चित नियम नसतो. शत्रूने भारताला 'हजारो जखमा देण्याचा' निर्णय घेतला आहे, ज्याचा अर्थ ते भारताला सतत नुकसान पोहोचवू इच्छितात. १९६५ मध्ये झुल्फीकार अली भुत्तो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतावर 'हजार वर्षांचे युद्ध' घोषित केल्याचाही उल्लेख केला. q संमिश्र पानावर

धोका पत्करल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही!

भारत दहशतवादाच्या आणि अणुहल्ल्याच्या धमक्यांच्या छायेखाली राहणार नाही. धोका नेहमीच असतो, परंतु जोपर्यंत तुम्ही धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवण्याचा मुख्य विचार होता, असे ते म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत