क्रीडा

हार्दिक चार महिन्यांनी मैदानात परतला

इशान किशनसुद्धा या स्पर्धेत सहभागी झाला असून मंगळवारी तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खेळताना दिसेल.

Swapnil S

नवी मुंबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या अखेर पायाच्या दुखापतीतून सावरत चार महिन्यांनी मैदानात परतला आहे.

नवी मुंबई येथे सुरू झालेल्या डी. वाय. पाटील टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने गोलंदाजी करताना २२ धावांत २ बळी मिळवले. त्यामुळे रिलायन्स वन्स संघाने भारत पेट्रोलियम संघावर २ गडी राखून मात केली. फलंदाजीत मात्र तो १०व्या क्रमांकावर आला. त्याने ४ चेंडूंत नाबाद ३ धावा केल्या. विश्वचषकात ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. आगामी आयपीएलमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेद्वारे तो पुन्हा लय मिळवण्यास उत्सुक आहे. इशान किशनसुद्धा या स्पर्धेत सहभागी झाला असून मंगळवारी तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खेळताना दिसेल. तसेच श्रेयस अय्यरही या स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते.

हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास महागला; १ एप्रिलपासून मोजावी लागणार 'इतकी' किंमत

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"