क्रीडा

बांगलादेशची कडवी झुंज, तरीही फिरकीसमोर अपयशी; भारत विजयापासून ४ पावले दूर

प्रतिनिधी

भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटीमधील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि भारताचा विजय आणखी एक दिवस लांबणीवर गेला. कारण, ५१३ धावांचे डोंगराएवढे आव्हान असतानाही बांगलादेशने कडवी झुंज देत ६ बाद २७२ धावा केल्या. पण, भारतीय संघ आता विजयापासून फक्त ४ पावले दूर आहे. कारण, बांगलादेशला अखेरच्या दिवसात २४१ धावा कराव्या लागणार आहेत. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या. नंतर बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. तर दुसऱ्या डावामध्ये भारताने २ बाद २५८ धावांवर डाव घोषित केला आणि ५१३ धावांचे लक्ष बांग्लादेशसमोर ठेवले.

बांगलादेशने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. जाकिर हसनने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. सलामीवीर नजमुल हुसैन शांतो आणि जाकिर हसनने पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला. अक्षर पटेल, कुलदीप यादवने बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. उमेश यादवने नजमुल हुसैन शांतो पहिली विकेट घेत मोठा ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर अश्विन, कुलदीप यादवने १ तर अक्षर पटेलने ३ विकेट घेतल्या.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

Health Tips: चालणे की पायऱ्या चढणे, वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी कोणता व्यायाम चांगला आहे?