क्रीडा

पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची निवड

विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि पंत हे सध्या कसोटी सामना खेळत असल्याने त्यांना पहिल्या टी-२० सामन्यात विश्रांती देण्यात येणार आहे

वृत्तसंस्था

इंग्लंड आणि भारत यांच्यात ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविड पहिल्या टी-२० सामन्यात संघासोबत नसेल. त्यामुळे या पहिल्या टी-२० सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि पंत हे सध्या कसोटी सामना खेळत असल्याने त्यांना पहिल्या टी-२० सामन्यात विश्रांती देण्यात येणार आहे. जूनच्या अखेरीस टीम इंडियाने आयर्लंडचा दौरा केला. भारताने या मालिकेत आयर्लंडला क्लीन स्वीप दिला. त्या दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण हे होते.

पहिल्या टी-२० साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ