ठाणे

चर्चेनंतर रिक्षाभाडे वाद मिटला

प्रतिनिधी

उपप्रादेशिक परिवहन विभागाने डोंबिवलीतील रिक्षा भाडे दर किती असावे असे अधिकृत दरफलक लावले नाही. किती अंतरासाठी किती दर हे ठरविण्याचा अधिकार रिक्षा युनियनला दिल्याचे दिसते. मनमानी रिक्षा भाडे वसुली होत असल्याचा प्रवाशांचा आरोप तर पेट्रोल आणि सीएनजीची वाढत्या भाववाढीमुळे जुने रिक्षा भाडे न परवडणारे असा रिक्षा चालकांचा कायमचा दावा यामध्ये प्रत्येकवेळी हमखास वाद होत असतात. यावर रिक्षाचालक आणि प्रवासी यांचे म्हणणे एकूण माजी नगसेवक नितीन पाटील व रंजना पाटील यांनी तोडगा काढला. प्रवासी व रिक्षाचालक यांना परवडतील इतके रिक्षा भाडे दर जाहीर केले. मात्र याला प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला संघटनेने विरोध दर्शविला आहे.

माजी नगरसेवक पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर यावर साधकवाधक चर्चा झाली. चर्चेअंती शेअर पद्धतीने रिक्षा प्रवासी वाहतूक केली जाईल असे ठरिवण्यात आले. शेअर पद्धतीने प्रवाशाला स्टेशनला जाण्यासाठी आता २१ नाही १२ रुपये आकारले जातील. तर मीटरपद्धतीने पूर्वीचे २१ रुपये रिक्षा भाडे आकारले जातील.

डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव, लक्ष्मण रेषा, तुकाराम नगर येथे शेअर रिक्षामध्ये तीन सीट भरल्या जातात. लक्ष्मण रेषा व तुकाराम नगर येथे शेअर पध्दत नसल्यामुळे प्रवाशांना स्टेशनला जाण्यासाठी मीटरपध्दतीने २१ रुपये आकारले जात होते. रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा अनेकवेळा रिक्षाचालकांशी वाद होत होते.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया