ठाणे

ठाकुर्ली कल्याण दरम्यान मोठी दुर्घटना ; हातातून निसटल्याने चार महिन्याचं बाळ गेलं वाहून

आपल्या डोळ्यासमोर आपलं बाळ वाहून गेल्यानं त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यात अंबरनाथ लोकल सेवा बंद पडल्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे २ तास उभी होती. यावेळी अनेक प्रवासी हे उतरुन कल्याणच्या दिशेने चालत जात होते. यावेळी एक चार महिन्याचं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई हे चालत होते. यावेळी मोठी हृदय द्रावक दुर्घटना घडली आहे. हे बाळ त्या काकांच्या हातून सटकले आणि वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेलं.

ही घटना घडताच त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला. लोकल उभी असल्याने त्या लोकच्या बाजूनं त्या बाळाची आई आणि काका चालत निघाले होते. मात्र, याच वेळी त्यांच्या हातातून बाळ सटकलं आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलं.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको