ठाणे

ठाकुर्ली कल्याण दरम्यान मोठी दुर्घटना ; हातातून निसटल्याने चार महिन्याचं बाळ गेलं वाहून

आपल्या डोळ्यासमोर आपलं बाळ वाहून गेल्यानं त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यात अंबरनाथ लोकल सेवा बंद पडल्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे २ तास उभी होती. यावेळी अनेक प्रवासी हे उतरुन कल्याणच्या दिशेने चालत जात होते. यावेळी एक चार महिन्याचं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई हे चालत होते. यावेळी मोठी हृदय द्रावक दुर्घटना घडली आहे. हे बाळ त्या काकांच्या हातून सटकले आणि वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेलं.

ही घटना घडताच त्या बाळाच्या आईने मोठा आक्रोश केला. लोकल उभी असल्याने त्या लोकच्या बाजूनं त्या बाळाची आई आणि काका चालत निघाले होते. मात्र, याच वेळी त्यांच्या हातातून बाळ सटकलं आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलं.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...