ठाणे

डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दी सरकारचीच जबाबदारी; राजू पाटील यांची टीका

मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी डोंबिवली रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथे रोज निर्माण होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि जीवघेणा प्रवास या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर घणाघात केला आहे.

Swapnil S

डोंबिवली : मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी डोंबिवली रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथे रोज निर्माण होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि जीवघेणा प्रवास या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर घणाघात केला आहे.

राजू पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र रोजचेच आहे. सरकारला रेल्वे म्हणजे केंद्राची जबाबदारी वाटते. एखादा अपघात झाला की ५ लाखांचा चेक घेऊन सत्ताधारी फोटोसाठी तयार असतात, पण रोजच्या या प्रवाशांच्या व्यथा कोणालाही दिसत नाहीत. डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. परंतु आजतागायत यावर कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत.

वंदे भारतमुळे उपनगरी सेवेवर ताण

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार वंदे भारत गाड्यांना देण्यात येणारी प्राथमिकता यामुळे उपनगरी सेवेवर ताण पडत आहे. मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा हे उपनगरी प्रवासी आहेत. त्यांच्या सुरक्षेची, सोयी-सुविधांची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे. केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको