गाझियाबाद : सकाळच्या चहाला उशीर केल्यामुळे पत्नीचा एका ५२ वर्षीय पतीने शिरच्छेद करून खून केल्याची घटना मंगळवारी गाझियाबाद जिल्ह्यातील फाजलगड गावात घडली.
धरमवीर जाटव असे या पतीचे नाव असून मेरठ जिल्ह्याकील कलंजरी या गावातील तो मूळ रहिवासी आहे. त्याने आपली पत्नी सुंदरीचा खून केला. त्यांच्या मुलाने यासंबंधात गाझियाबादच्या भोजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.