देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना; ग्रामीण भागातील रुग्णांना रस्त्या अभावी आहे डोलीचा आधार

ग्रामीण भागातील आदिवासींना आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना; ग्रामीण भागातील रुग्णांना रस्त्या अभावी आहे डोलीचा आधार

जव्हार: भारत पर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ,जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासींना आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो,ही अतिशय खेदाची आणि दुःखद बाब आहे. तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील एका वृध्द महिलेला रुग्णालयात नेताना रस्ता अभावी लाकडी डोली चा आधार घेऊन रुग्णालयात न्यायची वेळ आली.

भाटीपाडा गावात राहणाऱ्या लक्ष्मी लक्ष्मण घाटाल वय वर्ष ६२ या वृध्द महिलेच्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांचा पाय सुजला आहे,वेदना असह्य झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायचा निर्णय घेतला,रस्ता नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी डोली बनविली व काळशेती नदीच्या पात्रातून जवळ पास १०० मीटर अंतर पार करून मुख्य रस्ता येई पर्यंत ३ किलोमीटर अंतर चालत डोंगर दऱ्या व जंगलातून वाट काढीत रुग्ण जव्हार रुग्णालयात दाखल करण्यात आला,ही बाब बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांना फोन द्वारे समजले त्यांनी तात्काळ या रुग्णाला जव्हार येथे उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या गावात रस्ता व्हावा या साठी गेल्या दोन वर्षापासून दरोडा हे पाठपूरावा करत आहेत, परंतु अजूनही रस्ता बनविण्यासाठी निधी मिळाला नाही, ही जागा वन विभागात असल्याचे कारण देण्यात येत होते परंतु आता वनविभागाच्या ३(२) चा प्रस्ताव मंजूर झाला असून केवळ निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता होऊ शकेल असे बोलताना बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी सांगितले या वेळी झाप ग्रामपंचायत माजी उप सरपंच तुकाराम गरेल,चंद्रकांत वाढू,जगन खानझोडे,लक्ष्मण खानझोडे, विलास बागुल, व भाटीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in