

मुंबई : गणपती उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४६ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या ९८ गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या ७६ गाड्या, पुण्यावरून सुटणाऱ्या १० गाड्या आणि अनारक्षित विशेष ६२ गाड्यांचा समावेश आहे.
सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसएमटी ही दररोज धावणाऱ्या विशेष गाडीच्या ३२ फेऱ्या चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११०३ ही ११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या चालविण्यात येतील, तर गाडी क्रमांक ०११०४ ही विशेष गाडी १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोडवरून पहाटे ४.३५ वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या असतील.
सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसएमटी दैनिक विशेष गाडीच्या ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०११५१ क्रमांकाची ही विशेष गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल. या गाडीच्या १७ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तर गाडी क्रमांक ०११५२ ही विशेष गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून दुपारी ३.३५ वाजता सुटेल.
सीएसएमटी - रत्नागिरी - सीएसएमटी दैनिक विशेष गाडीच्या ३२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०११५३ क्रमांकाची विशेष गाडी ११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तर गाडी क्रमांक ०११५४ ही विशेष गाडी १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज रत्नागिरी येथून पहाटे ४ वाजता सुटेल.