

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये तपासणी दरम्यान किंवा पडताळणीअंती सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तत्काळ रद्द करण्याचा निर्णय कक्षाने घेतला आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध नियमांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना अनाथ, संरक्षण दल, दिव्यांग, अल्पसंख्यांक या आरक्षणाचे लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप करण्यात येत आहे.
कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश निश्चित केला आहे असे सिध्द झाल्यास अशा संस्थावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.