मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार जिल्हा बँकेतील शिपाई पदाच्या भरतीला आता ऑनलाइन पद्धतीतून वगळण्यात आले आहे. भरतीत १०० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कोणताही भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहकार विभागाने आहे.
या पदासाठी लेखी परीक्षेला ७० गुण आणि मुलाखतीला ३० गुण अशी गुणरचना निश्चित करण्यात आली असून, किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे.
....तर जिल्ह्याबाहेरील उमेदवार
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी चतुर्थ श्रेणीतील पदभरतीमध्ये संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, आवश्यक स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरण्याची मुभा आहे.