
भारतात नवीन शिक्षणपध्दती विकसित होत असताना फिनलंड सारख्या शिक्षणक्षेत्रात उत्तुंग असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणाचे तंत्र अवलंबून त्याचा भारतासाठी उपयोग केल्यास भारतीय शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल होईल.” असे उद्गार माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटी, पुणे व कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई फिनलंड)तर्फे शिरीन कुलकर्णी व हेरंब कुलकर्णी लिखित ‘शिक्षणगंगा - फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
सीसीई फिनलंडचे शिक्षणतज्ज्ञ नेल्ली लुहिवूरी, शिक्षणतज्ज्ञ ख्रिस्तोफ फेनेव्हेसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सीसीई फिनलंडचे संस्थापक व लेखक हेरंब कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. रत्नदीप जोशी व धनिक सावरकर हे उपस्थित होते.
डॉ. रत्नदीप जोशी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन अमेय खरे यांनी केले. तर धनिका सावरकर यांनी आभार मानले.