ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक यश; दोन्ही युतींमध्ये अटीतटीचा सामना

आज २० डिसेंबरला ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. काही ठिकाणी अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक यश; दोन्ही युतींमध्ये अटीतटीचा सामना

महाराष्ट्रात आज ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाच्या झेंडा फडकतो, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. (सदर आकडेवारी ही ८ वाजेपर्यंतची) या निकालानंतर भाजपने सर्वाधिक १९६६ ग्रामपंचायतींवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १४४६, शिवसेना शिंदे गटाने ८०२, काँग्रेसने ८३८ तर शिंदे गटाने ६६१ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. तसेच, काही इतर आघाड्यांनी १०६८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत.

तब्बल ३५ जिल्ह्यांमध्ये ७७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी सरासरी ७४ टक्के मतदान झाले होते.

काही ठराविक निकाल ज्यांनी लक्ष वेधून घेतले :

> उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायतमध्ये 'आप'ने विजय मिळवला आणि ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘आप’चा प्रवेश झाला आहे.

> पालघरमध्ये गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आनंद व्यक्त करताना म्हणाले की, "विजयाबद्दल नक्कीच आनंद आहे, आता हा आकडा वाढवत जावो."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in