जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. अखेर ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निघाल्या असून, यामध्ये दोन आमदार पुत्रांचा समावेश आहे. एकूण ३१७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतरही निवडणूक रंगतदार ठरणार असून आता ३२१ उमेदवार ६३ जागांसाठी आपले नशीब आजमावणार आहेत.
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) चे ४, राष्ट्रवादी व इतर पक्षांचे ५ आणि अपक्ष ३०१ असे एकूण ३१० उमेदवारांनी माघार घेतली. याआधीच्या दोन दिवसांत ७उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण माघार घेणाऱ्यांची संख्या ३१७झाली आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे, वैशाली अमित पाटील, विश्वनाथ सुरेश खडके, सागर शामकांत सोनवणे, रेखा चुडामण पाटील, गणेश सोनवणे, गौरव चंद्रकांत सोनवणे, विरेन खडके.