दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार
दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता ते ‘एकत्रित’ स्वरूपात दिले जाणार आहेत. गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव अधिक सुटसुटीत आणि इतर शासकीय कागदपत्रांशी सुसंगत असणार आहे.

मंडळाने नावाचा क्रम बदलून तो ‘विद्यार्थ्याचे नाव- वडिलांचे नाव-आडनाव’ असा सलग करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या संदर्भात सर्व विभागीय मंडळांना अधिकृत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपासून केली जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन स्वतंत्र कागदपत्रे दिली जात होती, परंतु आता ही दोन्ही कागदपत्रे एकाच पानावर एकत्रितपणे छापली जातील.

logo
marathi.freepressjournal.in