महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा; आशिष शेलार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा; आशिष शेलार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पॅरिसला रवाना
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचे सादरीकरण करत महाराजांच्या गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक मंत्री अड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी हे शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.

या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

पर्यटन विकास अन् अर्थव्यवस्थेला चालना!

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन सुनिश्चित होईल, असे ॲड.शेलार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in