Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि स्थानिक कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी
Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि स्थानिक कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला असून पुढील ९६ तास संपूर्ण महाराष्ट्र 'अलर्ट'वर राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in