बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून हिंदू विचार प्रत्येक घराघरात पोहचवले आणि शिकवले, मात्र...

तुम्ही इथून निघून गेल्यावर झाशीची राणी म्हणून बाहेर पडाल, हे निश्चित आहे, असे
बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून हिंदू विचार प्रत्येक घराघरात पोहचवले आणि शिकवले, मात्र...

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अमरावती येथे गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना माझ्या घरी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांना वरून आदेश देण्यात आला. त्यावेळी पोलिस हतबल झाले, त्यांनी माझ्यासमोर हात जोडले. मुख्यमंत्री कोणत्या अहंकारात होते हा माझा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून हिंदू विचार प्रत्येक घराघरात पोहचवले आणि शिकवले. त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे यांनी 56 वर्षांच्या मेहनतीची माती केली. 

तुरुंगातील प्रकाराबद्दल सांगताना राणा पुढे म्हणाल्या की, एक कॉन्स्टेबल मला म्हणाले, मॅडम तुम्ही रात्रीपासून सकाळपर्यंत उभे आहात. महिला म्हणून आम्हाला हे पाहावल जात नाही. सकाळी सगळे कॉन्स्टेबल मला भेटायला आले आणि म्हणाले, मॅडम, ही जागा तुमच्यासाठी नाही. आम्ही काहीही करू शकत नाही, पण तुम्ही इथून निघून गेल्यावर झाशीची राणी म्हणून बाहेर पडाल, हे निश्चित आहे, असे मत नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “जेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा आम्हाला लगेच जामीन मिळेल असे वाटले. मात्र, न्यायालयाने पोलिस डायरी पाहिल्यानंतर आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. लवकर जामीन नाही, त्यामुळे आम्हाला तुरुंगात राहावे लागले. शिवाय आणखी किती काळ तुरुंगात राहावे लागेल हे माहीत नव्हते. तेव्हा मी भावूक झाले होते."

मी 12 तास जेलमध्ये उभा राहून विचार केला आणि सकाळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मला त्रास झाला नाही. कारागृहात पाणी मागितले तर सीसीटीव्ही असल्याने ते देऊ शकत नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in