Jalgaon : जळगावातील तब्बल २४८ वीज कनेक्शन कट; नेमकं कारण काय?

जळगाव जिल्ह्यातील तब्बल २४८ शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली
Jalgaon : जळगावातील तब्बल २४८ वीज कनेक्शन कट; नेमकं कारण काय?
Published on

जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल २४८ शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आले. वीज बिल थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. महावितरण विभागाकडून २४८ शाळांचे वीज मीटर काढण्यात आले. यामुळे शाळेमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून या बातमीने पूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या २५०हून अधिक शाळांची वीजबिलाची थकबाकी थकीत असल्याने महावितरण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

वीज बिल थकविल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील २४८ शाळांचे वीज मीटर महावितरण विभागाने काढून घेतले. त्यामुळे या शाळांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान, ज्या शाळांमध्ये अनेक महिन्यापासून थकबाकी होती, ती वसूल होत नसल्याने महावितरणाकडून अशा शाळांचे वीज मीटर काढून घेण्याची कारवाई सुरु केली. यामुळे शाळा प्रशासनाचे नुकसान होत असल्याची टीका झाल्यानंतर मीटर काढून घेण्याची पुढील कारवाई थांबवली. मात्र, शाळांनी थकीत वीज बिले भरण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावी, अशा सूचना जिल्हापरिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in