
मुंबईतील प्रभाग क्रमांक १६५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा काँग्रेसचे आशरफ आझमी यांनी पराभव केला. आझमी यांना ७ हजार ७८२ मते, तर कप्तान मलिक यांना ४,८६३ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर, अनुभवी नेत्यांची उमेदवारी आणि प्रमुख पक्षांमधील थेट संघर्ष यामुळे ही लढत विशेष लक्षवेधी ठरली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका सिंह यांच्यात तिरंगी सामना होता.
नवी मुंबईतील १११ पैकी सुरूवातीच्या ५५ जागांवरील कलांमध्ये भाजप-शिवसेनेने स्पष्टपणे आघाडी घेतली असून दोन्ही पक्ष २७ - २७ जागांवर आघाडीवर आहेत. तर, शिवसेना (उबाठा) केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.
मुंबईतील पहिला निकाल आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. धारावी, वॉर्ड क्रमांक १८३ मधून त्या १४५० मतांनी विजयी झाल्या, यासोबतच काँग्रेसने मुंबईत आपले खाते उघडले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप १५, शिवसेना (शिंदे) ९, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
नाशिक महापालिकेत १२२ पैकी २२ जागांचे कल; भाजप ८, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ३ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ जागेवर आघाडीवर आहे.
मुंबईत भाजपला ९० जागा मिळतील आणि शिवसेनेला ४०; हा आकडा वाढू शकतो पण कमी होणार नाही. पुण्यात आम्हाला ११५ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
#WATCH | Pune | On counting for PMC elections, Maharashtra Minister Chandrakant Patil says, "People are seeing what we have done, not relying on election speeches... People are trusting us based on our past work. We raised this question in people's minds: If they (Shiv Sena UBT)… pic.twitter.com/LrOQgXPG3j
— ANI (@ANI) January 16, 2026
मीरा-भाईंदरमध्ये १० जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, शिंदेंची शिवसेना ५ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर आघाडीवर आहे.
ठाणे महापालिकेतील १३१ पैकी १५ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजप ६ आणि शिंदेंची शिवसेना ९ जागांवर आघाडीवर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २२ जागांचे कल हाती आले असून सर्व २२ जागांवर भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली आहे. १५ जागांवर भाजप तर ७ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीला येथे अद्याप खातेही खोलता आलेले नाही.
पुण्यातील १६५ पैकी ६४ जागांचे कल हाती आले असून भाजप सर्वाधिक ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १६, शिवसेना ४ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर पुढे आहे.
मुंबईतील २२७ पैकी ५६ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. ५६ जागांच्या कलांमध्ये भाजप २४, शिवसेना (उबाठा) १५, एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ६ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या, "एक्झिट पोल्स नेहमी अचूक ठरतातच असे नाही. महायुती सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या कामगिरीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाषिक किंवा प्रादेशिक मुद्द्यांवर नाही, तर विकासाच्या आधारावर जनतेसमोर गेलो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेच्या काळात दुबार मतदानासारखे आरोप केले, अशा आरोपांमुळे मतदारांमध्ये केवळ संभ्रम निर्माण होतो." याचवेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. “किशोरी पेडणेकर जिंकल्या किंवा हरल्या तरी त्यांनी केलेल्या कृतींचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील,” असेही मनीषा कायंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
VIDEO | Mumbai: On Maharashtra municipal corporation election results, Shiv Sena leader Manisha Kayande says, “Exit polls are not always accurate. We have confidence in our work over the past three and a half years under the Mahayuti government. We approached people based on… pic.twitter.com/zSnSuYj5Nn
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2026
VIDEO | Visuals from a counting centre in Pune as counting of votes for the Maharashtra civic body polls 2026 begins.
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)#MaharashtraCivicPolls2026 #Pune #ElectionUpdates pic.twitter.com/zUNqIBE4Jb
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ पैकी ४६ जागांचे कल समोर आले असून यानुसार भाजप आणि शिवसेना (उबाठा) सर्वाधिक १२ जागांवर तर एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ४ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ५ आणि अपक्ष ५ जागांवर आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, "मतमोजणीसाठी आम्ही १० वेगवेगळ्या झोननुसार १० ठिकाणी व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर २० टेबल आहेत, जिथे ईव्हीएमची मतमोजणी होईल. याव्यतिरिक्त, प्रत्येक झोनमध्ये टपाल मतांच्या मोजणीसाठी प्रत्येकी ४ टेबल असतील... सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होईल. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होईल.
VIDEO | Nagpur: On Maharashtra civic polls result, NMC commissioner and election officer Abhijit Chowdhury says, "For counting, we have arrangements at 10 different locations corresponding to 10 different zones. At each counting location, there are 20 tables where EVM counting… pic.twitter.com/RUA810LfzM
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2026
मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, टपाली मतपत्रिकेच्या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएम) मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून (स्ट्राँग रूम) बाहेर काढण्यात येतील. त्या अनुषंगाने, उमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरित्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरणदेखील त्याचवेळेला करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. सदर पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रांँग रूमबाहेर काढण्यात येणार नाहीत. याची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे तयार करण्यात आली असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर बातमी)
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.