राज्य सरकारच्या आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णयांवर आणि मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती व्यतिरिक्त एक महत्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काही अटींमुळे नियमित पीक कर्ज फेडण्यास प्रोत्साहन दिले जाईल, हे लक्षात घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. निवेदनानुसार, जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे पैसे देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.