शिवसेनेला होती उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेत नेमके काय घडले? भाजपने खरोखरच शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? याबाबत गेल्या सहा वर्षांत राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. त्यावेळी खरे काय घडले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रकाश टाकला. २०१९ मध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची नव्हे तर उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेनेला होती उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
शिवसेनेला होती उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोटDevendra Fadnavis @Dev_Fadnavis संग्रहित छायाचित्र (उद्धव ठाकरे)
Published on

पुणे : २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेत नेमके काय घडले? भाजपने खरोखरच शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? याबाबत गेल्या सहा वर्षांत राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. त्यावेळी खरे काय घडले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रकाश टाकला. २०१९ मध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची नव्हे तर उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

येथे झालेल्या ‘द जयपूर डायलॉग्ज’ कार्यक्रमात २०१९ च्या राजकीय घडामोडीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी बसलो होतो. आमची युती अंतिम झाली. पण रात्री एक वाजता उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं, “देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. मी तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. आता अंतिम निर्णय आज करू. मी म्हटले, मी याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा पक्ष संसदीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेतो. आमचे अध्यक्ष अमित शहा आहेत. मी त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर मी शहा यांना रात्री १ वाजता फोन केला. ते जागे होते. मी त्यांना म्हटले, आपले जागावाटप अंतिम झाले. पण उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे. अमित शहा म्हणाले, तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मंजूर नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, तर मग आपले जमणार नाही. त्यानंतर ते आपल्या मार्गाने गेले, मी माझ्या मार्गाने गेलो आणि आमची युती झाली नाही. चार दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून निरोप आला की, परत बोलायचे आहे. मी त्यांना म्हटले, आता नव्याने चर्चा होणार नाही. जर तुम्ही अडीच वर्षांच्या मागणीवर अडून असाल तर आमचा पक्ष त्याला तयार नाही. त्यावर आम्ही तो विषय सोडला, असे ठाकरेंनी सांगितले. आम्हाला लोकसभेची एखादी जागा वाढवून देत असाल तर आम्ही अडीच वर्षांचा मुद्दा सोडून देऊ, असे आम्हाला ठाकरेंनी सांगितले. त्यानंतर आम्ही परत बसल्यावर त्यांनी पालघरची जागा मागितली. मी त्यासाठी तयार नव्हतो. कारण ती जागा आम्ही बऱ्याच वेळा जिंकली होती. आमची पारंपरिक जागा होती. पोटनिवडणुकीतही आम्ही जिंकलो होतो. त्यावर ठाकरे म्हणाले, आम्हाला ही जागा पाहिजे. त्यानंतर मी अमित शहा यांच्याशी बोललो. त्यावर शहा म्हणाले, जाऊ दे, ते आपले जुने मित्र आहेत. एका जागेने काय फरक पडणार? तुम्ही त्यांना जागा द्या, असे सांगितले. अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही उमेदवारांसह ठाकरेंना पालघरची जागा दिली, असा दावा फडणवीस यांनी केला.

एक दिवस आधी मला ठाकरेंचा फोन आला. अमित शहा आणि मी मातोश्रीवरून पत्रकार परिषदेला येतो, असे सांगितले. मी अमित शहा यांना त्याबाबतची माहिती दिली. त्यावर अमित शहा म्हणाले, मी मातोश्रीवर येतो. पण कोणती चर्चा होणार नाही. मग आम्ही गेलो. त्यानंतर मी अमित शहा यांना घेऊन जाताना तासभर पूर्वी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. मी म्हणालो, काय बोलायचे आहे? त्यावर ते म्हणाले, मला अमित शहा यांच्याशी बोलायचे आहे. आमच्या काही भावना मांडायच्या आहेत. आमच्या काही गोष्टी ऐकल्या नाहीत हे सांगायचे आहे. पुढे सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजे, त्यासाठी मला अमित शहा यांच्याशी बोलायचे आहे. त्यावर मी म्हटलं, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी बोलून टाका. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्यानंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. आम्ही ‘मातोश्री’त बाहेरच्या रूममध्ये बसलो होतो. आदित्य आणि रश्मी वहिनीही होत्या. त्यावेळी मीच उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली की, तुम्हाला काहीतरी बोलायचे होते. ते म्हणाले, हो.. ५ मिनिटे बोलतो. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा आतल्या रूममध्ये बसले. त्यानंतर मला आत बोलावले आणि सांगितले की आता चर्चा अशी झाली की, एक फेस सेव्हिंग आपल्याला द्यायचा आहे. आता तुम्ही पीसीत असे सांगा की सत्तेत आमचा (शिवसेनेचा) सहभाग असेल, असे ते म्हणाले.

युती संपुष्टात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मीच बोलायचे ठरले होते. ठाकरे आणि अमित शहा बोलणार नव्हते. पीसीत काय बोलायचे हे मी त्यांना बोलून दाखवले. त्यानंतर रश्मी वहिनींना बोलावले. मी परत तीच गोष्ट वहिनींसमोर बोलून दाखवली. तीच गोष्ट मी हिंदीत बोललो. मी काय बोलायचे ते मंजूर झाले. त्यानंतर आम्ही ब्ल्यू सी नावाचा हॉल आहे तिथे गेलो आणि जसे ठरले होते तशीच माझी कॅसेट वाजवली. हिंदी, मराठीत बोललो. दोघे काही बोलले नाहीत. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. असे सांगतानाच मातोश्रीच्या बंद दरवाजाआड कोणतीही वेगळी गोष्ट ठरली नव्हती. आतमध्ये हे लोक बसले होते. आत काही ठरले असते तर मला सांगितले गेले असते. असा काही विचार आहे हे सांगितलें असते. पण तशी कोणतीच चर्चा झाली नव्हती, असे ते म्हणाले.

निवडणुकीच्या प्रचारसभेत प्रत्येक सभेत मोदी, शहा आणि नड्डा वारंवार देवेंद्र यांच्या नेतृत्वात लढत आहोत. देवेंद्र मुख्यमंत्री बनणार आहेत, असे म्हटले होते. तेव्हा उद्धव ठाकरे सभेत टाळ्या वाजवत होते. असे सांगतानाच भाजपने उद्धव ठाकरेंना काही आश्वासन दिले होते, असे आपण एका मिनिटासाठी समजू. पण निकाल लागल्यावर त्यांनी फोन करून काय करायचे, काय नाही हे ठरवले असते ना? असा सवाल फडणवीस यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in