"...तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल", आदित्य ठाकरेंना सरकारवर हल्लाबोल

राज्यपालांनी लक्ष घालण्याचं आवाहन देखील आदित्य यांनी केलं आहे.
"...तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल", आदित्य ठाकरेंना सरकारवर हल्लाबोल

लोअर परेळच्या डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्धघाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन आहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लोकांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. उद्घाटनासाठी वेळ नसल्याने डिलाईरोडचा पुल बंद ठेवण्यात आला होता. मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाहीत. वेळेत काम पूर्ण न केलेल्यांवर गुन्हे दाखल करत नाही. भ्रष्टाचार आम्ही समोर आणले. पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आम्ही समोर आणल्यानंतरही २२ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट घातला. मुख्यमंत्र्यांचे काही दिवस राहीले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालण्याचं आवाहन देखील आदित्य यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना आदित्य यांनी नवी मुंबई मेट्रो विषयी देखील भाष्ट केलं आहे. नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार असून सुरु केली नव्हती. सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवाळी बोनसचा प्रश्न उपस्थित केल्यावर बोनस दिला गेला. मुख्यमंत्र्यांना समज द्यावी, अशी मागणी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रस्ते ब्लॉक केले जातात. एकीकडे भाजप सांगतं व्हीआयपी कल्चर नको आणि दुसरीकडे रस्ते बंद करतात. पूल सुरु केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला, असं जर आम्हाला म्हणत असतील तर मग समृद्धी महामार्गाचं उद्धघाटन केल्यानंतर जे अपघात झाले मग आता कोणावर गुन्हा दाखल करायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in