हा केंद्र सरकारचा शेवटचा अयशस्वी प्रयत्न - नाना पटोले

जाणीवपूर्वक होत असलेल्या या करवाईंत चौकशीत काहीही होणार नाही असेही पटोले म्हणाले
हा केंद्र सरकारचा शेवटचा अयशस्वी प्रयत्न - नाना पटोले
Published on

कल्याण : बुधवारी कल्याणात नगरीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत हे सरकार विरोधकांना भीती दाखविण्यासाठी ईडी आणि सीबीआय चौकशी हा अयशस्वी प्रयत्न असून तो शेवटचा प्रयत्न आहे. न्यायालयानेही ईडी आणि सीबीआयवर ताशोरे ओढले आहेत. जाणीवपूर्वक होत असलेल्या या करवाईंत चौकशीत काहीही होणार नाही असेही पटोले म्हणाले. या मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केले असून सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in