भाजपने जे पेरले तेच उगवले! वैभव नाईक यांचा टोला

कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

सिंधुदुर्ग : कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

सध्या भाजप व शिंदे शिवसेना यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून रंगलेली जुंप आणि कार्यकर्त्यांचे सुरू असलेले पक्षांतर यावर प्रतिक्रिया देताना नाईक बोलत होते. भाजपचे खरे नेतृत्व प्रभाकर सावंत किंवा रवींद्र चव्हाण करत नाहीत, तर ते राणे कुटुंबच करत आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला. सत्ता बदलली की राणे कुठे जातील, तिथे त्यांचे कार्यकर्ते जातील.

भाजपमध्ये शेवटी मोजके कार्यकर्तेच उरतील, असा दावा त्यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नाही, असे सांगत नाईक यांनी भाजपला मतदारांचे प्रश्न सोडवा, जनतेची कामे करा आणि विचाराधारित कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही दिला.

logo
marathi.freepressjournal.in