

ऊर्वी महाजनी/ मुंबई
बँक ऑफ बडोदाने सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देणाऱ्या उद्योगपती अनिल अंबानी यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने सांगितले की, पुढील कार्यवाहीपूर्वी ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करतील. तुम्ही तीच दाद मागत आहात. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेला आहात. अंबानींचे ज्येष्ठ वकील कार्ल तांबोळी यांनी युक्तिवाद केला की, बँकेची कारवाई एसबीआयच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमसाठी ‘बीडीओ’ने तयार केलेल्या न्यायवैज्ञक लेखा परिक्षणावर आधारित आहे, ज्याचा वापर इतर बँका करू शकत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला.