भावना असेल तर कोणतेही काम सोपे होईल -अनिल गलगली

ज्या क्षेत्रात जायचे आहे, हे आताच ठरवावे
भावना असेल तर कोणतेही काम सोपे होईल -अनिल गलगली
Published on

मुंबई : जिद्द आणि आत्मविश्वासामुळे माणसाच्या आयुष्यातील कठीण कामेही सोपी होतात. अशी भावना असेल तर कोणतेही काम सोपे होईल. पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सनग्रेस हायस्कूल आणि ज्युनियर हायस्कूल, हिमालय सोसायटी, घाटकोपर (प.) येथे आयोजित दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात सांगितल्या. गलगली म्हणाले की, आज जगभरातील विद्यार्थ्यांचा कल संगणक, आयटी, वैद्यक आणि अभियांत्रिकीकडे झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार विषय निवडला पाहिजे, त्यानुसार त्यांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, हे ठरवावे.”

logo
marathi.freepressjournal.in