मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी; २४० कोटी रुपये अंदाजित खर्च

बिहार सरकारने मुंबईत प्रस्तावित ‘बिहार भवन’ उभारण्यासाठी ई-निविदा मागवली आहे. निवासासाठी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या बिहारमधील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मोठा पायाभूत प्रकल्प हाती घेतला जात आहे.
मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी; २४० कोटी रुपये अंदाजित खर्च
मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी; २४० कोटी रुपये अंदाजित खर्च
Published on

मनोज रामकृष्णन/ मुंबई

बिहार सरकारने मुंबईत प्रस्तावित ‘बिहार भवन’ उभारण्यासाठी ई-निविदा मागवली आहे. निवासासाठी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या बिहारमधील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मोठा पायाभूत प्रकल्प हाती घेतला जात आहे.

राज्याच्या इमारत भवन निर्माण विभागाने जारी केलेल्या निविदा सूचनेनुसार, अभियांत्रिकी-खरेदी-बांधकाम पद्धतीने ही निविदा दोन टप्प्यांच्या प्रणालीद्वारे तांत्रिक आणि आर्थिक बोली काढण्यात आली आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाटणा येथील विभागाच्या कन्स्ट्रक्शन डिव्हिजन क्रमांक २ कडून केले जात आहे.

या इमारतीचा अंदाजित खर्च २४०.१६ कोटी असून कंत्राटदारांना २.५० कोटींची अनामत रक्कम जमा करावी लागेल. बांधकाम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

निविदा प्रक्रिया १६ मार्चपासून सुरू झाली आहे. इच्छुक कंत्राटदारांना २५ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान सरकारच्या ई-प्रोक्युअरमेंट पोर्टलवरून ‘बिल ऑफ क्वांटिटीज’ डाउनलोड करता येणार आहे. ऑनलाइन बोली सादर करण्याची अंतिम तारीख २ मे २०२६ आहे. ४ मे २०२६ रोजी तांत्रिक बोली उघडल्या जातील, तर सक्षम प्राधिकरणाकडून तांत्रिक प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक बोलींचे मूल्यांकन करण्यात येईल. १० एप्रिल रोजी पाटणा येथील मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. तर १७ एप्रिल वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमटीएनएल इमारतीतील बिहार गुंतवणूक आयुक्तांच्या कार्यालयात दुसरी बैठक होणार आहे.मुंबईत आधुनिक प्रशासकीय सुविधा उभारण्याच्या बिहार सरकारच्या व्यापक योजनेचा हा प्रकल्प एक भाग आहे. या प्रस्तावित इमारतीत निवास व्यवस्था, इतर सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उपचारासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आणि अधिकृत कामासाठी मुंबईला भेट देणाऱ्या बिहारमधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

अतिथीगृहाच्या धर्तीवर विकास होणार

अधिकाऱ्यांच्या मते, देशातील इतर महानगरांमध्ये असलेल्या राज्य अतिथीगृहांच्या धर्तीवर ही सुविधा विकसित केली जाणार असून मुंबईतील बिहारमधील नागरिकांसाठी प्रशासकीय कामकाज आणि जनकल्याण उपक्रमांचे केंद्र म्हणून ती कार्य करेल.

logo
marathi.freepressjournal.in